My Blog List

Thursday, 27 June 2019

वृद्धाश्रम


DEEP MESSAGE

स्थळ अर्थातच पुणे.
पुणे माझं दुसरं घर. पुण्य बद्दल मला फार आपुलकी , प्रेम आणि जवळीक आहे. पुण्याने मला अपेक्षे पेक्षा जास्तच दिलं आहे, मी कायम पुण्याचा ऋणी राहणार.

बऱ्यापैकी लोकांना माहित आहे कि "Neil-The-Story-Teller" वर्षातून ३ महिने "Neil-The-Mango-Seller" असतो.

"रत्नागिरी हापूस आंबा विक्री" हा पूर्णपणे व्यवसाय म्हणून नाही, तर Part-Time म्हणून चालू केलेला माझा एक प्रामाणिक प्रयत्न. आयुष्यात कोण काय शिकवून जाईल काही सांगत येत नाही. 
"म्हणतात ना माणूस हा आपल्या चुकांमधून शिकतो, पण शिकण्या साठी चुका केल्याच पाहिजेत असं नाही, प्रत्येक क्षणा-क्षणात एक शिकवण आहे, फक्त डोळे उघडून पहा आणि कान उघडून एका". 

हापूस आंबा माझा साठी एक असा सवंगडी म्हणून आला, ज्याची मी आतुरतेने वाट बघत असतो.
आदी आंबा खाण्यात मजा यायची, आता आंबा इतरांपर्येंत पोहोचवण्यात येते.

हापूस आंब्या मूळ मी बऱ्याच लोकांशी जोडलो गेलो. व्यवसाय म्हंटलं कि सगळ्यात मोठा घटक "Human Resource Management".
देवा च्या कृपेने (Touch-Wood & Fingers crossed ) सगळी देव माणसं भेटली, मग ते आंब्याचे बागायतदार असो वा Transport वाले किंवा आंब्याचे ग्राहक. 
व्यसायात बोलणे फार महत्वाचे, अस म्हणतात. जर तुम्ही मला भेटला असाल तर मी किती आणि कस बोलतो, हे आपल्याला माहित असेलच (आपलंच कौतुक कशाला 😉😉😉).
पण कधी कधी असं काही घडतं कि जे शब्दां पलीकडे असतं. जिथं शब्दांच कुंपण नसतं , असतात फक्त आणि फक्त भावना.

हे छोटंसं लिखाण अश्याच एका अनुभवा बद्दल, जे ऐकून मी स्तब्ध झालो आणि बराच काळ विचारात पडलो.

घर: पालकां शिवाय घर म्हणजे "अनाथाश्रम“ आणि मुलां शिवाय घर म्हणजे "वृद्धाश्रम”

वर्षातून मला दोन गोष्टींची फार आतुरता असते , एक म्हणजे माझा माणूस गणपती बाप्पा" आणि दुसरा महत्वाचा म्हणजे "फळांचा राजा- आंबा".
मार्च महिना आला कि हापूस आंबा येण्याची उत्सुकता चालू होते. मी माझा बागायतदार ना एक आगाऊ भेट देऊन येतो, म्हणजे आंबा हंगामाच Timing कळतं. २ वर्षात आंब्याच्या निमित्ताने बऱ्याच माणसांशी संपर्क झाला. बरेच "आंबा शौकीन" भेटले. एकदा का फळांचा राजा आला, कि सुट्टी देत नाही. दररोज आपलं आंबा आणणे आणि आंबा घरपोच पोचवणे, इतकाच काम.

एके दिवशी मला आंब्याच्या Order साठी फोन आला. त्या २-३ महिन्यात अनोळखी नंबर वरून येणारे फोन अपेक्षित असतात , पण तो फोन अपेक्षित न्हवता. फोन होता "सदाशिव पेठ" मधून.
सदाशिव पेठ मधनं order म्हणजे "मानाचा नारळ" मिळण्या सारखं आहे.

"नमस्कार, तुम्ही आंबे विकता ना"
"नमस्कार, हो Madam."
"आमच्या मुलाच्या मित्राने तुमच्या कडून आंबे घेतले होते, त्यांच्या कडूनच तुमचा नंबर मिळाला".
"आम्हाला हि तशेच , अस्सल रत्नागिरी आणि एकदम चोख आंबे हवेत, खात्रीशीर मिळतील ना..??" 
"मिळणार-मिळणार, कधी, किती आणि कुठे पाहिजते तुम्हाला?"

त्यांनी मला त्यांचा घरचा पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, मी आंब्याचा बॉक्स घेऊन त्यांच्या घरी गेलो. पत्ता सापडायला काय अवघड नव्हता. सदाशिव पेठ नावाला शोभेल अशी apartment होती, Typical construction. जुनं बांधकाम renew केलं होतं. खाली दुकानं होती आणि वर जाण्यासाठी एक छोटासा रस्ता (Passage). मी गाडी लावून वर पहिल्या मजल्यावर गेलो. पुणेरी पाट्या तर जगभर प्रसिद्ध आहेत, पण तिथं कुठं दिसल्या नाहीत. (सदाशिव पेठ मध्ये अपेक्षित होतं). Building renew केली होती, पण दरवाज्यावरची पाटी बहुदा जुनीच दिसत होती. नाव एकदम ठळक अक्षरात लिहिले होते, मी दरवाज्याची घंटी वाजवायची तसदी घेतली नाही. हलकीशी कढी वाजवली. लगेच दरवाजा उघडलेला आवाज आला.
"काकू नमस्कार, मी निलेश, रत्नागिरी हापूस आंबे, आपलं बोलणं झालं होतं फोन वर..!!"
"अरे ये बाळ ये, घर सापडला ना लगेच, काही त्रास नाही ना".
"नाही नाही, लगेच सापडलं".
फोन वर आवाज जास्त तरुण होता, पण प्रत्येक्षात काकू बऱ्याच वयस्कर होत्या. डोक्यात सगळी चांदीच चांदी होती.
पण उच्चार एकदम स्पष्ट (सदाशिव पेठ आहे शेवटी, अपेक्षित होतंच ते).
मी घरात आत आलो. Building बहुतेक, फक्त बाहेरून renewate केली होती.
Hall मध्ये Marble च्या Checkered tiles होत्या, ज्या ९०च्या काळी फार प्रसिद्ध होत्या. एकाच भिंतीला खिडकी होती, त्यामुळं थोडा अंधार खोलीत जाणवत होता.
फुर्निचर जून होतं, पण सागवान होतं. एक मोठा सोफा , २ खुर्च्या आणि मध्ये मोठा Teapoy. एका भिंतीवर LED TV निवांत लटकला होता. हॉल मधून जाण्याऱ्या Passage ला पडदा होता, विशेष म्हणजे त्याचं Pelment पण बहुतेक सागवान होतं. घरानं भोगलेला सूख प्रत्येत गोष्ट ठळक पने सांगत होती.

काकू एक पेला पाणी घेऊन बाहेर आल्या. (पुण्यात पेलाच असतो, इतरवेळी आम्हाला तांब्याची बघायची सवय). 
मी त्यांच्या पाया पडायला वाकलो , "अरे राहूदे".
मी तरीपण पाया पडलो,"औक्षवंत हो".(हा आशीर्वाद माझा साठी नवा होता).
मी एका खुर्चीत बसलो.
"Box उघडून आंबा दाखवतो".
"अरे पहिला पाणी पी जरा, काही गडबड नाही".
मी त्या बोले पर्यंत बॉक्स उघडून आंबा त्यांच्या समोर Teapoy वर ठेवला.
आंबा हातात घेऊन त्या म्हणाल्या "आंबा सुरेख आहे....!!".
"सुरेख" हा शब्द ऐकून मला कित्येक वर्ष झाली असतील.
"Thank You. तुम्हाला आवडला ना ह्यातच सगळं मिळालं मला".
"ओंकार आहे ना, माझा मुलगा, त्याच्या मित्राने तुझ्या कडून आंबा घेतला आहे. त्यानेच तुझे नाव सुचवले".
"हल्ली बाजार मध्ये आंबे मिळतात, पण अस्सल रत्नागिरी च्या नवा खाली दुसराच आंबा दिला जातो". 
आमची किरकोळ बोलणी चालू होती. तितक्यात Bell वाजली.
"हे आले असतील". त्यानी गडबडीने दार उघडलं. "हे" म्हणजे त्याचे "अहो" म्हणजेच "काका" होते. अपेक्षे प्रमाणे, काका एकदम फिट होते. जवळ पास ५,१०" उंची, कलप केलेले केस, काळा जाड चष्मा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य.
"तुम्ही बसा मी चहा ठेवते"
मी त्यांना नमस्कार केला "मी निलेश, रत्नागिरी हापूस घेऊन आलोय".
"अरे वा , छान छान. फार कौतुक ऐकलंय तुमचं ओंकार च्या मित्रा कडून".
"तुम्ही कुठे असता, म्हणजे मूळचे इथलेच का..??"
"माझा गाव कोल्हापूर, पुण्यात नोकरी ला असतो".
"तुमची बाग आहे का रत्नागिरीला..??"
"नाहीनाही, माझी बाग वैगेरे काही नाही आहे"
"मग हे आंबे आणि नोकरी कसं काय?"
"चालू आहे आपली धडपड, काही तरी सुचल म्हणून चालू केलंय. रत्नागिरी मधून आणून सगळी कडे विकतो".
"मी MSEB मध्ये होतो , मागच्या वर्षी निवृत्त झालो, आता निवांत असतो बघा. आमची Batting inning संपली"
काकांचा स्वभाव एकदम Jolly होता.
"आमचं इथंच खाली एक मेडिकल शॉप आहे, ओंकार बघतो आणि सून बाई जॉब करते. ती 
गेले आता माहेरी थोडे दिवस. नात पण तिच्या बरोबर गेली आहे, ती असती तर आंब्याचं उदघाटन अत्ताच झालं असतं".
तोपर्यंत काकू चहा घेऊन आल्या.
"तुम्ही कुठे कामाला असता ..??"
"अहो तो इथं जॉब ला असतो पुण्यात, मूळचा कोल्हापूर चा आहे", मी काही बोलण्या आधी काकींनी सांगितलं.
चहा पीत आमचं बोलणं चालू होतं, आंबा आणि त्याचे वेग-वेगळे किस्से रंगले होते.
कमी वेळात ते Comfort zone मध्ये आले होते.
तोपर्यंत मला एक फोन आला.
"अमेरिकेत आंबा पोच करू शकाल काय म्हणून..!!"
तो त्या दोघांनी पण ऐकला.
"तुम्ही परदेशी पण आंबा पाठवता काय, ..??", काका कुतूहलाने म्हंटले.
"अजून तर नाही, पण प्रयत्न चालू आहेत. आपली बरीच माणसं म्हणजे भारतीय लोक परदेशी आहेत आणि आंबा हा प्रत्येकाचा आवडीचा आणि आपुलकीचा विषय. चौकशी बरेच लोक करत असतात, कारण फक्त आंबा बाहेर मिळतो, पण अस्सल हापूस आंबा मिळत नाही"
मी हसून म्हणालो, "अर्ध पुणे तर अमेरिकेत आहे..!!" (हे वाक्य मी नको म्हणायला पाहिजे होतं).
ते ऐकून दोघांचे चेहर्या वरचे भाव थोडे बदलले, त्यात स्मितहास्य होतं पण एक गंभीर छटा आलेली.
"तुमचं कोण आहे का परदेशी, म्हणजे कस जर आंबा बाहेर जायला लागला तर आताच ऑर्डर fix करतो", मी वातावरण थोडं Normal करण्या साठी बोललो.

"नशीब आमचं, कि आमचं कोणीही परदेशी नाही", काकी एकदम म्हणाल्या.

मला त्यांचा बोलण्यातला स्वर लगेच कळाला, त्यात राग आणि तिरस्कार होता.
मी शांत बसलो होतो.
काकू परत चालू झाल्या, "काय करायचा तो पैसा, आयुष्यात पैसाच म्हणजे सगळं असतं काय..??".
"माणसांना आणि नात्यांना काही किंमत आहे का नाही,,,, कि फक्त Foreign-Foreign आणि Foreign....!!"
काका त्यांना सावरत म्हंटले, "आपला मुलगा आहे ना आपल्या जवळ, तू कशाला BP वाढवून घेतेस".
"आमचे एक पाहुणे आहेत, त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे , घरी आई वडील एकटेच असतात. वर्षातून एक-दोन महिने त्यांना तो अमेरिकेत बोलावून घेतो, इतर वेळी दोघे घरीच असतात", काका सांगू लागले.
"ते जोडपं थोडं वयस्कर आहे. मागच्या वर्षी गणेशोत्सव ला त्या काकांना Heart चा Problem झाला. Checkup नंतर कळलं कि ६०% blockage आहे.
Angeoplasty करावी लागणार होती. त्यांच्या मुलाने अमेरिकेतून फक्त पैसे पाठवले आणि सांगितलं operation करून घ्या, मला कामाचा Load आहे मी नाही येऊ शकत".
"आम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबत होतो, Medical field मध्ये असल्या मुलं ओंकार ची खूप मदत झाली. Doctor ,Hospital, औषध इत्यादी सगळं काही त्यानेच बघितलं".
मधेच काकी म्हंटल्या, "काय उपयोग असली मुलं असून...?? जीवाचं रान करून लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्यांना कर्त्यव्यदक्ष बनवलं, हे असले दिवस बघण्या साठी".
काकींचे डोळे पाणावले होते. काका तिला सावरत तिज जवळ जाऊन बसले, "मनाला लावून घेऊ नकोस"
"बाळ तुला हे ऐकायची गरज नाही. पण एक सांगू, तू आमच्या घरी आल्या आल्या माझा पाया पडलास म्हणून आपुलकीने बोलत आहे".
"तसं काही नाही काकू, तुम्ही हे म्हंटलात हेच खूप आहे माझा साठी", मी उत्तर दिलं.
"तुला वृद्धाश्रम माहित आहे...??", हा प्रश्न अनपेक्षित होता.
"हो माहित आहेत ना, पण कधी जाण्याचा योग आला नाही".
"नशीबवान आहेस, कधी वाटलं ना आयुष्यात आपण फार कमावले आहे, एकदा नक्की वृद्धाश्रम ला भेट दे, देवा परी विठू-माउली ला वैकुंठवारी साठी सोडून त्यांची मुले अज्ञात वासात जातात".
"आमच्या काळी वृद्धाश्रम न्हवती, होती पण ती अनाथ वृद्धां साठी असलेली वृद्धाश्रम होती, ज्यांचं कोणीही न्हवतं. पण आताची वृद्धाश्रम म्हणजे ज्यांचे मुलं-मुली सुदृढ कमावती आणि मुख्य म्हणजे जिवंत आहेत पण आई वडील नको झालेत अश्याना वृद्धांना सांभाळणारी हि वृद्धाश्रम आहेत".

काकूंच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, त्यांनी साडीच्या पदराने डोळे पुसले आणि तसेच धरून रडू लागल्या. 
"अहो हा पाहुण्यांचा आलेला अनुभव फार वाईट होता, त्यांना तर अपेक्षित न्हवतंच आम्हाला देखील धक्का बसला, जेव्हा त्यांच्या मुलाने अमेरिकेतून येण्यास नकार दिला आणि फक्त पैसे पाठवले".

"पैसे महत्वाचे आहेतच, मी नाही म्हणत नाही, पण आपल्या माणसांपेक्षा नाही", काका सांगत होता. 
मी फक्त शांत पणे ऐकत होतो, कारण बोलण्या साठी माझ्या कड काहीच न्हवतं.




"एक सांगू बाळ, आपण शिकावं , फार मोठं व्हावं पण आपल्या आई वडिलांना कधी विसरू नये. फार कष्ट घेतात आईवडील मुलाला मोठा करण्यात”.









“पालकांची काजळी घेता येत नाही म्हणून जिथं ठेवतात ते वृद्धाश्रम, पण जेव्हा मुलं
पालकांना घरी सोडून कायमचं जातात ते घर सारखं घर राहत नाही, ते पण एक सजवलेलं वृद्धाश्रम होऊन जातं".

हे वाक्य फार खोल होतं, एकदम विचार करायला लावणारं.

"वृद्धाश्रमात पैसे घेऊन काळजी घेतात, इथं स्वतः पैसे देऊन मोकळे होतात आणि इतर वेळी काही लागला तर आमच्या सारखी पाहुणे मंडळी आहेतच कि काळजी घ्यायला".

"त्यांचा महिना २ लाख पगार काय कामाचा, जर माझी मुलंच माझा जवळ नाहीत”.

“मला ना फार बरं वाटतंय, कि आम्ही ओंकार ला जास्त नाही शिकवलं, नाहीतर तो देखील
गेला असता अमेरिकेला परदेशी आणि आम्ही ह्या आमच्या २bhk फ्लॅट ला वृद्धाश्रम करून राहिलो असतो".

काकू जे काही बोललेल्या ते मनाला सुन्न करणारं होतं. मला एक वेगळा दृष्टकोन समजला. खरंच आयुष्यात पैसे महत्वाचा आहेत,ती सत्य परिस्थिती आहे, पण पैसे आपल्या माणसांपेक्षा मोठे नक्कीच नाही.
Money can buy everything, but not Affection: Neil the Story teller








Friday, 14 June 2019

गुलमोहर_भाग-४: पेहला नशा पेहला खुमार



FIRST KISS:
RD आणि तेजूच्या प्रेमाच्या प्रवासा बरोबर, पावसाळा ऋतू हि चालू झाला.

एकेदिवशी कॉलेज मध्ये "National Level Paper Presentation" ची जाहिरात लागली. मोठा Event होता, म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याला नोंदणी केली. RD ला त्याबद्दल फार उत्सुकता नव्हती, पण जेव्हा त्याला समजलं की तेजू पण सहभाग घेणार आहे त्यानेपण लगेच नाव नोंदवले.

Event हा एक महाविद्यालयावर होता जो दुसऱ्या शहरात जवळपास ३५-४० किलोमीटरच्या अंतरावर होता. RD "Transportation committee"चा सदस्य होता आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांकरिता वाहतूक करण्यासाठी जबाबदार committee वर होती. पाऊस होता म्हणून त्यानी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक बस बुक केली, पण RD स्वतः मित्राबरोबर बाईक ने गेला.

कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता होता. राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम असल्यामुळे, विविध शरातील विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. Teju was a studious girl & here paper presentation was great as expected. RD तेजू इतका हुशार न्हवता पण vocabularyआणि आत्मविश्वास भरपूर होता. त्याचे Presentation Skills देखील प्रभावी होते. कार्यक्रम २:00 वाजता समाप्त झाला. २:३० वाजता निकाल घोषित होणार होते. अपेक्षे प्रमाणे तेजू चा पहिला नंबर आला आणि  त्यांच्या कॉलेज ला पण बरीच बक्षिसे मिळाली. RD ला काही बक्षीस मिळालं नाही, पण तेजू चा नंबर आलाय हे ऐकून तो एकदम खुश होता.

त्या महाविद्यालयाने विजेत्यांसाठी विशेष "Guest Lecture" आयोजित केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी बसमधून परत निघण्याचा निर्णय घेतला, पण तेजू ला ते Lectureसाठी थांबायचे होते. तिनं हे RD ला सांगितलं. RD ने इतर सर्व विद्यार्थ्यांना बसमधून जाण्यास सांगितले आणि तो तेजू बरोबर थांबून नंतर बाईक वरून परत येईल असा plan केला."Guest Lecture" BARC चे  एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ यांचे होते. It was a nice session. ४ वाजता कार्यक्रम संपला . RD उत्सुकतेने कार्यक्रम संपायची वाट पाहत होता, कारण परतीचा रस्ता तेजू बरोबर चा होता. सगळं आटपून दोघे पार्किंग मध्ये आले. 

"आज कोणतरी लै खुश दिसतंय,..!!"
तेजू गालात हसली."महिन्याची मेहनत कामी आली एकदाची". 
"सकाळ पासून नुसती पळा-पळ चालू होती, आता जरा बारा वाटतंय", तेजू म्हणाली.
"काय राव,,,,एवढ्यात दमला होय,,,,!!"
"अरे खरंच सकाळ पासून नुसता गोंगाटा आहे,,,,जरा शांतता पाहिजे आता..!!"
"इथे जवळच एक गड आहे, तू पहिला आहेस काय,,?? एकदम शांत आणि मस्त वातावरण असते"
"नाही रे, मी नाही गेलो कधी तिकडं, किती लांब आहे इथून"
"जास्त नाही १०km असेल, १५-२० मिनिट अंतर".
"Next Time कधीतरी जाऊया, कारण परत इथून माग घरी पण जाईचा आहे ना आणि पावसाचं  वातावरण पण झालं आहे..!!"
"Next Time असं काही नस्तय, सगळी अंध-श्रद्धा आहे".
तेजू हे ऐकून हसली."चल मग आताच जाऊया".
RD खुश झाला, कारण त्यांना थोडा का होईना निवांत एकांत वेळ मिळणार होता.
दोघे तिथं थोड्या वेळात पोचले.
पावसाळ्या मूळ सगळं हिरवं गार होतं.
गड चांगल्या परिस्थितीत होता आणि गडा वर एक छान उद्यान पण होते.

दोघे तिकडं गेले. तिथं त्यांना खायला “भाजलेलं कणीस” घेतलं
उद्यानात एका बाकड्यावर बसले, वर्दळ फार कमी होती.
आभाळ दाटून आलेलं आणि छान वारं देखील सुटल होतं. तेजू बाकड्या वर RD कड तोंड करून बसली. 
RD आपल्या पारंपरिक बसण्याच्या शैलीत होता, एकदम शांत आणि डोळे जमिनी मध्ये रुतलेले.
"काय झालं साहेब , तू इतका शांत का आहेस ???". 
"तुला काय माझी भीती वाटते काय, मी समोर असलो कि एकदम शांत असतोस, इतर वेळी नुसता दंगा-धुडकुस चालू असतो तुझा..!!"
"एवढा शांत मला नाही आवडत, काहीतरी बोल".
RD तेजू कड नबघता म्हणाला, "मला काय बोलायचे माहित नाही, तू इथे माझ्याबरोबर आलीस, ह्यातच मी खूष आहे". 
RD, “एक सांगू”
तेजू, "एक नको दोन सांग"
RD, "मला इथं नेहमी यायचे होते आणि ते पण कुणीतरी "खास"व्यक्ती बरोबर".

PAUSE,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

"आणि माझा साठी तू एकदम खास आहेस, Very Very Special”

दोन मिंट एकदम शांतता. 
तेजू RD कड एकसारखं टक लावून बघत होती.
RD आपलं मान खाली घालून शांत, ना एक ना दोन.
तेजू, "तू मेरी acting कर रहा हे". 
"म्हणजे ..??"
तेजू,"काही नाही रे,,,,,!!!"
तिने RD चे दोन्ही हात धरले , "तू हे म्हटलंस त्यात मला आनंद आहे". 
ती RD च्या एकदम uncomfortably जवळ आली होती, इतकी जवळ कि तिला RD चा वाढलेले हृदयाचे ठोके जाणवत होते.
RD ह्या क्षणा साठी तयार न्हवता, पण somewhere down the heart he had wished for it.
RD was quite nervous & so was Teju.
तितक्यात जोराचा वारा चालू झाला. तेजू ने RD चा हात अजून घट्ट धरला.
तेजू अजून पण एकटक RD कड बघत होती, हे RD ला पण जाणवलं.
थोडी हिम्मत करून RD तेजूच्या नजरेत नजर मिळवली. उद्यानात त्यावेळी जवळ-पास कोणीही न्हवते. डोळ्यांचा खेळ चालू झालेला.

"तुम्ही कितीही प्रयत्न करा, डोळ्यांना बोलण्या पासून कोणीही थांबवू शकत नाही."

"आँखे किसीके मोहताज नही होते".

“Eyes have their own Language & the Beauty is they NEVER LIE”- Neil-the-Story-teller

फक्त दोघांचे डोळे बोलत होते. तेजू RD च्या अजून जवळ आली, RD ला जाणवलं.
दिल तो पागल हे वाला dialogue, "और पास-और पास" वाला scene.
तेजू ने RD च्या हाताला घट्ट पकडलं. RD चे Heart Beats Extreme वाढले होते.
तेजू RD जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपली.
दोघांच्या पण मनात भावनांच वादळ चालू होतं. RD ने अलगद असा आपला हात तिच्या खांद्या वर ठेवला. तेजू RD च्या डाव्या बाजूला बसली होती. 

बाहेर ढग गडगडात होते आणि दोघांची हृदयं पण.

दोघं हि तशाच Position मध्ये ५-६ मिंट होते, ना एक शब्द ना हाल चाल.
"तेजू"
"बोलू नकोस काय,,,,मला हा क्षण साठवून ठेवुदे".
RD ने आजूबाजूला कोण आहे का बघायला मान इकडे तिकडे वळवली.
पाऊस येणार म्हणून बहुतेक सगळं शांत होतं, कोणीही न्हवतं.
"RD..!!"
"बोल ना..!!"
"काही नाही".
"अरे  काय झालं". 
"काही नाही रे, असंच".
RD ने त्याचा खांदा जरासा उचलला, तेजू त्याच्या कडे बघावं म्हणून.
तेजू, "काय झालं".
"तू सांग, बोलता बोलता शांत का एकदम".
"काही नाही, असंच".
RD ने परत खांदा जरा हलवला. 
तेजू ने वर बघितलं, तेव्हा RD अगदी तिच्या चेहऱ्या समोर होता.
“That was the very moment”.
त्यांचे डोळे एकमेकात रुतले होते.
दोघांना एकमेकाची उब आणि प्रेम जाणवत होतं.
तेजू लाजून खाली बघणार तोपर्यंत, RD ने उजव्या हाताने तिचा चेहरा पकडला.
तेजू पुरती घामावली होती, तो क्षण अतिशय रोमांचित होता.
वादळाची चिन्हे जितकी बाहेर होती, तितकीच दोघां मध्ये होती.
वारा सुटल्या वर कशी अचानक पहिली वीज अनेपक्षित पडते तसं झालं.
दोघे हि एकमेकात पुरते हारवले होते. RD ने तेजू ला अजून जवळ ओढलं,
तेजू त्याच्या ओघात होती.
पाऊस जसा नभातून जमिनीच्या भेटली आतुर असतो, तीच परिस्थिती होती.
RD चं कपाळ आता तेजूच्या कपाळावर होतं. एकमेकांचा वाढलेला श्वास दोघांना जाणवत होता.
दोघांचे डोळे बंद झाले आणि "They Experienced-The First Kiss".
RD चे ओठ तेजूच्या ओठांवर होते. पहिल्या प्रेमाचा पहिला Kiss- Priceless.
(पोटात फुलपाखरू उडत होती, ती जी feeling असते ना, एक नंबर, Out of the World)
थोड्याच क्षणात दोघे हि भानावर आले. दोघेही एकमेका कड पाहत होते. तेजू ने RD ला घट्ट मिट्टी मारली. RD ने अलगद तिला कुशीत घेतलं.

The Hearts were beating in Sync now.

जश्या भावना जुळल्या होत्या, तशीच त्यांची मन देखील जोडली गेली होती. दोघांचे हृदयाचे ठोके एकसाथ पडत होते. प्रेमाची उबदार मिठीत दोघं हरवले होते.

Return journey was Fantastic.
RD ने तेजू ला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडले.
RD पुढं  हॉस्टेल ला गेला. दोघं शरीराने जरी दूर असले तरी अजून ते तिथंच होते "एकमेकाच्या उबदार मिटत".
ती गुलाबी रात्र,  मोठी असणार होती , कारण ना मन ठिकाण्यावर होते ना डोके आणि ना हि विचार.
अर्दी रात्र दोघांनी जागून काढली, नंतर निद्रादेवी त्यांच्यावर प्रसन झाली.

>>>>>>>>>> भाग  समाप्त<<<<<<<<<<

Link to Next Chapter






Friday, 7 June 2019

प्रत्येक “का” ला उत्तर नसतं..!!

प्रत्येक “का” ला उत्तर नसतं..!!



तसं मी नकारात्मक काही लिहीत नाही. मी फक्त माझे अनुभव रेखाटत असतो. त्यातून कुणी काही घ्यावं ही माझी अपेक्षा पण नाही. वाचून एखाद्याला आनंद झाला , काही साकारात्म वाटलं म्हणजे माझा लिखाण मार्गी लागलं. मी तसा वयाने छोटा तर आहेच आणि अनुभवाने तर अजून छोटा आहे.

हि कथा म्हणजे माझा एका मित्राला आलेला एक अनुभव आहे, वाईट नाही म्हणू शकत पण सत्य परिस्तिथी आणि कलियुग भाकीत करणारा प्रसंग.

त्याने ज्या अंतःकरणाने मला ती सांगितली म्हणून मी हे लिहीत आहे.

कथा पूर्ण पणे सत्य आहे. फक्त मी हे त्याच्या नजरेतून दाखवत आहे.


मी मूळचा इंदापूर चा. माझं सगळं शिक्षण इथंच झालं. वडिलांची सरकारी नोकरी असल्या मुळे, गावो-गावी बदली होत असत. पण एकाच ठिकाणी मी शिकावं म्हणून आम्ही कायम स्वरूपी गावीच होतो. त्यांची सेवा निवृत्ती इंदापूर मधेच झाली, म्हणज नोकरीची शेवटची ७ वर्ष का असेना माझं कुटुंब एकत्र होतं. वडील नोकरी ला असताना, मी Engineering करून पुण्याला नोकरी साठी आलो. गावी नोकरी ला जास्त वाव न्हवता आणि शहराची ओढ म्हणून पुण्याला जाण्याचा निर्णर घेतला. वडिलांची त्याला संमती आणि पाठिंबा देखील होता.

वडील सकाळी कामाला जायचे आणि आई घर सांभाळायची. माझी मोठी बहिणीचं लग्न गावातच झालेलं. कधी काही लागलं तर ती हाके च्या अंतरावर होतीच.

आई-वडिलांनी मोठ्या कष्टानं घर उभं केल होतं. घरची शेती तर होतीच, पण घराची पण त्यांनी जणू बागचं केलेली होती. आंबा , नारळाची झाडं , गुलाब, जास्वंदी, मोगरा इत्यादी. आज पर्यंत देवपुजे साठी कधी बाहेरून एक फुल आणायला लागलं न्हवतं. आणि अश्या ह्या घरात माझे विठू-माउली आनंदाने राहत होती.

काही वर्षा पुरी माझा लग्न झालं. घराला दिवाळी प्रमाणे सजवलं होतं. एकुलता एक म्हणा किंवा आई-वडिलांची हौस म्हणा, पण घर एकदम नटलं होतं.
परम-आनंद हा आपली माणसं जवळ आणि एकत्र असला तर द्विगुणित होतो.

वाईट ह्याचं वाटतं कि हे सुख सोडून, किरकोळ पैशां-साठी आपलं गाव, आपली माणसं दुरावली जातात.

कधी कधी विचार येतो "का..?"",

पैशे कमवायचे कुणासाठी , जर माझी माऊलीच दूर होणार असली तर, ह्याचा उपयोग तर काय..?? पण मला दर वेळी माझा वडीलां कडून धीर मिळायचा. त्यांनी पण सरकारी नोकरी मूळ आपलं गाव सोडलं होतं, त्यांनी हे दुःख जवळून अनुभवल होतं. फक्त आणि फक्त त्यांच्या विश्वासावर, पाठिंब्यावर आणि शब्दावर मी माझा गाव सोडलं.

पुण्याची चांगली गोष्ट म्हणजे ते इंदापूर पासून २-३ तासाच्या अंतरावर आहे. कधी काही लागलं तर जाणं-येणं एकदम सोईस्कर. लग्नाच्या एका वर्षात आमच्या घरी पाळणा हलला. मला दर वेळी वाटतं, माझा आई च्या प्रेमा पोटी म्हणून , माझी आईच माझा पोटाला आली.

मी नोकरीत आता पूर्ण अडकलो होतो, इतर नोकरदार प्रमाणे , पुण्यात फ्लॅट घेतला होता. पगाराला आता बरेच हप्ते चालू झाले होते. आम्ही महिन्या तुन एकदा गावी जायचो आणि आई वडील इकडे यायचे. वडिलांची जुनी सवय "घराला कुलूप लावायचे नाही", म्हणून त्यांचे इकडे राहणे फार कमी व्हायचे.

मुख्य मुद्दा:

माझा फ्लॅट एका "Typical Society" मध्ये आहे. जवळ पास सगळीच नोकरदार कुटुंब.
मी दिवस-भर ऑफिस मध्ये, बायको आणि मुलगी घरी. जसा सगळ्या society मध्ये बायकांचा ग्रुप असतो तसा आमच्या इथे ही होता. त्यांचं दिवस भर काही ना काही चालू असायचं. एक दिवस मी घरी आलो, तेव्हा एक वयस्कर बाई आली होती. तिच्या बरोबर एक लहान मुलगी पण होती , कदाचीत नात असावी. त्यांची चर्चा बहुतेक चांगलीच रंगलीं होती, कारण दररोज मला आल्या-आल्या चहा देणारी माझी बायको तिच्या सोबत बोलण्यात गुंग होती. मला स्वतः जेवण करायला फार आवडते. मी मला आणि त्यांना चहा ठेवला आणि मुलांना घेऊन गॅलरी मध्ये बसलो. थोड्या वेळाने त्या निघाल्या. बायको तिच्या मुलगी ला घ्यायला आत आली.

मी त्या बाईची प्रतिमा आठवत होतो. वय वर्ष ५०च्या पुढचे असेल, एकदम काटक बांधा.
सुरकुतलेले हात आणि पाय त्यांनी आयुष्यात घेतलेले कष्ट जोर जोरात सांगत होते. साधी सहावारी साडी, पदर डोक्यावरून घेऊन कंबरेत खोचलेला. कपाळावर गोंदण होते पण प्रेमळ दिसणारे ते डोळे एकदम शून्य भावनेनं जमीनीत रुतलेले होते.

ती चालली म्हणून आमची बारकी दंगा करू लागली. मी तिला घेऊन बाहेर आलो, बघतो तर त्या आजीच्या डोळ्यात पाणीच पाणी. डोळे पुसत त्यांनी मुलीला घेतलं आणि त्या निघाल्या.
मी बायको कड बघितल, तिनें इशाऱ्याने "थांबा" म्हणून सांगितलं. "नंतर बोलू. माझा जेवणं राहिलंय", एवढाच बोलून ती Kitchen मध्ये गेली.

रात्री सगळं आवरल्यावर ती सांगू लागली. ती फॅमिली नवीनच आलेत society मध्ये. आपल्या गावाकडचं गाव आहे त्यांचं. आई-वडील गावी असायचे, आता आई इकडे मुलं कडे आल्या आहेत. इथे दोघे पण न्हवरा-बायको कामाला असतात. १ वर्षा पूर्वी त्यांना मुलगी झाली. बाळंतपणी तिला ३ महिने सुट्टी होती, तेव्हा ती गावीच होती. पण job होता म्हणून तिला परत यावे लागले. तिची पोरगी शेजारच्या "Day Care" ला असते. दोघे पण सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी उशिरा परत येतात. जेवणा साठी बाई येते. १ महिन्या पूर्वी त्यांनी त्यांच्या आई ला म्हणजे मुलीच्या बाबाच्या आई ला गावा वरण इकडं आणलं. "Day-Care" पेक्षा आई बघेल मुली कड बघंल म्हणून.

मी मधेच म्हंटलो "आणि त्याचे बाबा? त्यांच कोण करणार..??"

बायको परत सांगू लागली. वडील स्वतः करून खातात. ते retired आहेत म्हणजे साठी(६०) गाठली असलंच आता आणि ह्यांनी आईला इकडं बोलवून घेतलाय बघा. त्यात झालाय काय, गावा कड जरी असलं तरी त्यांच्या घरी घरकामाला बाई असते, साफ-सफाई , भांडी, धुणे सगळ्या कामाला. आईला कामाची सवय नाही.
आई आल्या वर त्यांनी जेवण करणारी बाई पण बंद केली, आई करेल म्हणून...!!
आता झालाय काय आई ला असल्या कामाची सवय नाही आणि वया मूळ कदाचित जमतपण नसेल. त्यांच्या कडून काही काम होत नाही, तरीपण सगळं काम आईच करते. सकाळी आवरून नाश्ता आणि जेवण, नातीला सांभाळणे, परत संध्याकाळी जेवण. सून कामावरून आली कि मुलीला घेत देखील नाही, आजीला मुलीला घेऊन जेवण करायला लागतंय. मुलीचे वडील काही लक्ष्य देत नाहीत. सून फक्त खाते आणि रात्री जेवणाची भांडी पण धूत नाही. आजी जेवण आवरून बाहेर पडायच्या आत, सून पायात चप्पल घालून तयार असते.

हे सगळं ऐकून सुन्न झालो मी. मला काही सुचेना.

Human Tedancy आपण दरवेळी correlate करतो, मी माझा आई वडिलांचा विचार करू लागलो. आमचे विठू-माउली कधी एका शब्दाने काही बोलले नाही. वडील सरकारी नोकर त्या मुळे त्यांना pension चालू होईल हि, पण मुलगा म्हणून कधी मी घरी काही कमी पडू दिलं नाही.

आई ला घरी कामा करण्यासाठी आणायचं, विचार तर किती वाईट, पापचं म्हणावे लागेल ते.

मी त्या कुटुंबाचा विचार करत होतो, ह्या सगळ्या मध्ये नेमका अपराधी कोण किंवा म्हणावं (pardon my language) नालायक कोण..??

मुलगा:
ज्याने आपल्याच आईला घरकाम करायला आणलं. ज्याला चिंता  फक्त आपल्या Career, बायको आणि मुलीची...????

सून:
जिला अपेक्षा आहे कि सासूने सगळं घरकाम करून तिच्या मुलीला सांभाळावं. तिला पण चिंता फक्त आपल्या career, मुलगी आणि नवऱ्याची...??? 

आई:
जी मुलाच्या सांगण्या वर्ण आपल्या  न्हवऱ्या ला एकटं सोडून आली, हे  माहित असताना कि त्यांचं आता वय झालाय आणि बघणारं कोणीही नाही...??

वडील:
ज्यांनी आपला म्हातारपणी आणि "Post-Retirement" चा एकमेव आधार आपल्या अर्धांगिनी ला, जरा हि विचार न-करता त्यांच्या मुला कड पाठवलं..??

म्हणतात ना "सत्य कपनेच्या पलीकडे असते".

मला सत्य काय असेल कल्पना देखील करवत नाही.

मला माहित आहे आणि माझाच Dialogue आहे "प्रत्येक "का" ला उत्तर नसते".

तरी देखील एक वादळ मनात घोंगावत होतं "का,,,, असं का....??""


"Every Crack has a Glorious Story to tell"- Neil the story teller